Wednesday 23 April 2014

स्वामी समर्थ महाराज

श्री स्वामी समर्थ महाराज:


श्री स्वामी समर्थ भारत भ्रमण करुन अक्कलकोटला का आले यामागे काहीतरी रुढी संकेत असावा असे वाटते म्हणूनच अक्कलकोट हे आज प्रज्ञाक्षेत्र मानले जाते.

सोलापूर शहरापासून अवघ्या २४ मैलाच्या अंतरावर श्री क्षेत्र अक्कलकोट आहे. अक्कलकोट मध्ये एकून १२८ खेडयांचा तालुक्यात समावेश करण्यात आला आहे. मुंबई, मद्रास रेल्वे ब्रॉडगेज मार्गावर अक्कलकोट हे एक मध्यरेल्वेचे छोटेसे स्थानक आहे. रेल्वे स्थानकापासून हे गाव ७ मैल अंतरावर आहे. गावात जाण्यास एस.टी. महामंडळाने सोई करुन दिल्या आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट पासून गाणगापूर, तुळजापूर. पंढरपूर, गुलगर्बा ही तीर्थक्षेत्रे फ़ारच जवळ आहेत. येथूनच १६ मैल अंतरावर गोगांव स्वामी मंदिर (खैराट मार्ग) आहे. बोरी व हरणा या दोन नद्या अक्कलकोट परिसरातून वाहतात या क्षेत्रात आपल्याला ह्या दोन्ही नद्यांचा संगम पहावयास मिळतो. या संगमाजवळ श्री संगमेश्वराचे अतिशय पुरातन मंदिर आहे. मंगरुळ, तडवळ ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. तसेच मंगरुळ व दुधनी हे गाव विडयाच्या पानासाठी प्रसिध्द आहे.

श्री स्वामी समर्थ महाराज ओळख:
अक्कलकोट स्वामींची ओळख पाहली असता ती श्री नृसिंह सरस्वती अशा भुमिकेस अनूसरुन आहे. श्री नृसिंह सरस्वती हे श्रीशैल्य येथे कर्दळी वनात समाधीस्त बसले होते त्यांच्या समाधीचा कालावधी हा तीनशे वर्षाचा होता. महाराज समाधी अवस्थेत असतांना उध्दव नावाचा लाकूडतोडया त्या जंगलात लाकूड तोडण्यास गेला. लाकूड तोडता-तोडता उध्दवची कुऱ्हाड ही चूकून एका वारुळावर पडली कुऱ्हाड पडल्यामूळे महाराजांची समाधी भंग झाली व त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. ती कुऱ्हाड पडल्यामूळे महाराजांना मांडीला जखम झाली होती महाराजांना झालेल्या जखमेतून रक्त निघत असल्यामुळे उध्दवाने तेथील वन‍औषधीचा लेप महारजाच्या जखमेला लावून दिला. स्वामींना ज्या ठिकाणी जखम झाली होती त्याठिकाणी त्या जखमेची खूण आजही आपणास दिसून येते. त्यानंतर स्वामींनी उध्दवला आशिर्वाद दिला व ते तेथून पुन्हा भक्तांच्या कल्याणाकरीता निघाले. महाराज हे दत्त्‍अवतारी होते असे स्वामीभक्त मानतात.

महाराजांची शरीरयष्टी अत्यंत धिप्पाड होती. कांती तेज:पुंज होती. त्यांचा वर्ण गोरा होता ते अजानबाहू होते. त्यांचा चेहरा उग्र होता, संत्र्याच्या रंगाप्रमाणे त्यांच्या तोंडावर तेज होते. त्यांच्या कानाच्या पाळ्या विशाल असून ते वयातील होते. पण जेव्हा ते चालायचे तेव्हा साध्या माणसांना त्यांच्याबरोबर पळत जावे लागायचे. महाराज नेहमी लंगोटी नेसत असत त्यांच बरोबर महाराजांची वृत्ती विलक्ष होती. नित्यनियम असे काही नव्हते. दूसऱ्याने स्नान घालणे, जेवण घालणे इत्यादी मात्र करावे लागत असे. तसे महाराज कोठेपण जात तेव्हा बोलतांना हूक्का ओढणे तर चालूच असायचे पण दर घटकेस त्यांची वृत्ती वेगळी असायची इतके असून त्यांच्यातील पवित्रता, मांगल्य कधीही भंग पावलेले नव्हते, म्हणून हजारो भक्त आजही स्वामींच्या दर्शनाला श्री क्षेत्र अक्क्लकोट येथे येतात.


अक्कलकोट संस्थान:
अक्कलकोट हे इ.स. १९४८ पर्यंत राजधानीचे ठिकाण होते. अक्कलकोटचे जहांगीर "फत्तेसिंग भोसले" (पूर्वीचे नाव राणोजी लोखंडे) यास छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १६१२ मध्ये वंशपरंपरेने आपली राजधानी दिली. इ.स. १८४८ मध्ये सातारचे राज्य खल्लसा झाले त्यामुळे अक्कलकोट संस्थानाचा सर्व कारभार हा ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली आला होता असे म्हणतात.

No comments:

Post a Comment